अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय इयत्ता नववी

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल


प्रश्न. 1. वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. 


उत्तर :

प्रश्न. 2. स्पष्टीकरण लिहा. 

1) अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. 

उत्तर :

i) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटनांशी संबंधीत असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. 

ii) मासिक उत्पन्नातून तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी गरजांच्या तीव्रतेनुसार क्रमवारी लावता येते. अधिक महत्त्वाच्या गरजा आधी भागवल्या जातात आणि कमी महत्त्वाच्या गरजा नंतर पूर्ण केल्या जातात. उदा.- आजारपणामध्ये आईस्क्रिम खरेदी करण्याऐवजी औषधाला जाधान्य दयावे लागते. 

iii) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यांत बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा, हे अर्थशास्त्रामुळे समजते. या विवेंचनावरून असे स्पष्ट होते की अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.


2) भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. 

उत्तर :

i) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते. 

ii) जी अर्थव्यवस्था केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खासगी भांडवलशाही स्वरूपाची नसून, जिच्यात त्या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते, अशी अर्थव्यवस्था. 

iii) प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत. 

iv) अशाप्रकारे आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा 'मिश्र अर्थव्यवस्थे'ला भारताने प्राधान्य दिले. म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.


3) अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात. 

उत्तर :

i) जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पडतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था. 

ii) जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांची भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. कमाल नफा मिळवणे हा या अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते. 

iii) चीन, रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. सामाजिक कल्याण साधणे हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांचे घटक एकत्रितरीत्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. 

iv) भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम या देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखणे होय. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या विवेंचनावरून हे स्पष्ट होते की, अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.


प्रश्न. 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 

1) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते ?

उत्तर :

व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते.


2) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे ?

उत्तर :

अर्थशास्त्र ही संज्ञा ओईकोनोमिया (OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.


3) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते ?

उत्तर :

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते. 


4) जागतिकीकरण म्हणजे काय ?

उत्तर :

जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय.

Previous Post Next Post