इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
उत्तर :
इ.स. १८०३ मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले. ओडिशात मध्ययुगीन काळात पाईक पद्धती अस्तित्वात होती. पाइकांना त्या काळात जमिनी करण्यासाठी दिल्या गेल्या होत्या. त्यावर पाईक उदरनिर्वाह करत. परंतु इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. याचा परिणाम इ.स. १८१७ मध्ये इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.