अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय वाटते

अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय वाटते

अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय वाटते ?

उत्तर :

अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे. 

i) आज जगभरातील जवळ जवळ सर्वच राष्ट्रे अणुबॉम्ब बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतही क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे. 

ii) वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि कधीही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटेल या भितीने आपआपली सैनिकी ताकद वाढविण्यास प्रयत्नशील आहेत. भारतही त्यात मागे नाही. आशिया खंडात याबाबतीत आता स्पर्धा सुरु झालेली आहे. यामुळे जागतिक शांतता भंग होत आहे. 

iii) आज जगातील अनेक देशांनी अणुबॉम्ब व अण्वस्त्र सज्जतेमुळे महासत्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे दररोज जगातील कोणत्या ना कोणत्या देशात आतंकी हमले होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडत असतात. आपल्या देशातील जनता आतंकवादाच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. या सर्वामुळे जागतिक शांततेस धोक निर्माण झाला आहे. 

iv) अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक आतंकवाद वाढण्यास खत-पाणी मिळाले आहे. देशातील असुरक्षिततेची भावनाही जागतिक आतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठस्त आहे. देशातील जागतिक आतंकवादामुळे ही जागतिक शांतता नष्ट होत आहे. 

v) अण्वस्त्र सज्जता असलेली शक्तीशाली राष्ट्रे ताकदीच्या जोरावर जागतिक शांतता निर्माण करु शकतात. पण ती दीर्घकाळ टिकत नाही.

या सर्व चर्चेवरून अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे हे स्पष्ट होते.

Previous Post Next Post