संकल्पना स्पष्ट करा जागतिक शांतता

संकल्पना स्पष्ट करा जागतिक शांतता

संकल्पना स्पष्ट करा जागतिक शांतता 

उत्तर :

i) आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिक शांतता आवश्यक असते. जगातील अर्धविकसित आणि अविकसित देशांच्या विकासासाठीही जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे स्पष्ट मत होते. याच कारणामुळे भारताने सुरुवातीपासूनच जागतिक शांततेचा पुरस्कार केला. तसेच आपल्या परराष्ट्रीय धोरणात शांती प्रयत्नांना महत्त्वाचे स्थान दिले. 

ii) जागतिक शांतता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे भारत कोणत्याही लष्करी किंवा सैनिकी संघटनात सामील झाला नाही. याशिवाय जगात कोठेही युद्ध सुरू झाल्यास ते तात्काळ थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न केले. 

iii) जागतिक शांततेच्या उद्देशाने प्रेरित होऊनच भारताने इजिप्त, कोरियास, व्हिएतनाम आणि इंडोचायना तसेच इराण, इराक या देशातील संघर्षात युद्धबंदीसाठी सतत प्रयत्न केले. पाकिस्तानचा पराभव करणे सोपे असूनही काश्मीर प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्राकडे नेला. आणि पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेशही परत केला. यांवरून भारताचे जागतिक शांतता धोरण दिसते.

Previous Post Next Post