टिपा लिहा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा
उत्तर :
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी अशा निर्बंधाला मूठमाती दिली.
सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन रोटीबंदी झुगारली. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.
२२ फेब्रुवारी १९१८ रोजी संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. प्र. ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.