विधाने सकारण स्पष्ट करा.
भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली.
उत्तर :
काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. मात्र काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. यासाठी पाकिस्तान हरिसिंगवर दबाव आणू लागला. १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा भारतावर सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली.