नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते, हे स्पष्ट करा.
उत्तर :
नोकरशाहीने धोरणांच्या अंमलबजावणीतून अनेक बदल सामान्य नागरिकापर्यंत आणले आहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात.
स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकाचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठी योजना इ. बाबत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते; म्हणून नोकरशाहीमुळे राजकीय व्यवस्थेला स्थैर्य लाभते.