विधाने सकारण स्पष्ट करा.
प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.
उत्तर :
महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन केली. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यांसारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारमार्फत लोकन्यायालयादवारे केलेला न्यायनिवाडा लाक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता, प्रसार, जातिभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली. त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.