शिरीषकुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे ?
उत्तर :
शिरीषकुमार हा एक बालवीर. त्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. शिरीषकुमारने तिरंगा हातात घेऊन नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मिरवणूक काढली. वंदेमातरमची घोषणा दिली. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीषकुमार, लालदास, धनसुखलाल, शशिधर घनश्याम हे विद्यार्थी हुतात्मे झाले. शिरीषकुमार यांच्य कार्याने आम्हाला स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचाही विचार न करता, देशाचा विचार प्रथम करावा ही शिकवण मिळाली. मी या देशाचा नागरिक आहे, हे जितके महत्त्वाचे तितकेच मी देशासाठी काय करतो हे विचारही महत्त्वाचे आहे.