गिरणी कामगार संपावर गेले

गिरणी कामगार संपावर गेले

 

 विधाने सकारण स्पष्ट करा

प्रश्न

 

गिरणी कामगार संपावर गेले

उत्तर

 

कारण - i) १९८१ च्या दिवाळीत कामगारांना २०% बोनसची अपेक्षा होती. 

ii) कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून, कामगार वर्गाला विश्वासात न घेता ८ ते १७% वर तडजोड केली. 

iii) बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉ. दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 

iv) ६५ गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि त्याचे नेतृत्त्व दत्ता सामंत करू लागते. त्यामुळे गिरणी कामगार संपावर गेले.


 


Previous Post Next Post