भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते

भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते

भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते ?

उत्तर :

भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य -

i) भारताला एकूण सुमारे ७५०० किमीचा सागरकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील या देशालाही ७४०० किमी लांबीचा सागरकिनार लाभला आहे. 

ii) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच ब्राझीलमध्येही मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशात रोजगारनिर्मिती व परकीय चलन प्राप्त कर लाठी मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो.

iii) भारतामध्ये मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे त्याचप्रमाणे ब्राझीलमध्येही मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. 

भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक - 

 भारत

 ब्राझील

 

i) भारताला ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे ७५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

ii) भारत हा देश खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रणी आहे.

iii) भारतामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो.

iv) भारतात हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या तिन्ही भागांना सागरी किनारा लाभला आहे.

 

i) ब्राझीलला भारतापेक्षा कमी म्हणजे ७४०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ii) ब्राझील या देशात फक्त खाऱ्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे.

iii) ब्राझीलमध्ये वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून मासेमारी केली जाते.

iv) ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर यांचा सागरी किनारा लाभला आहे.


Previous Post Next Post