भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
कारण
i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नदयांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. त्यामुळे देश-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.
iii) पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतात चालना दिली जात आहे. म्हणून भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.