उत्तर | ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज आहे. कारण आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही लाभला आहे. या वारशाचे जतन व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. या ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन हे पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आवश्यक आहे. विविध ऐतिहासिक वास्तूमुळे सामाजिक प्रेरणा व स्फूर्ती मिळते. |