भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत

प्रश्न

 भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?

उत्तर

 

 

भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे -

i) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत.

iii) केवळ शासकीयच नव्हे, तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

iv) शासनव्यवहारात सर्व पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे.

Previous Post Next Post