शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास काय होईल, असे तुम्हाला वाटते

शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास काय होईल, असे तुम्हाला वाटते

प्रश्न

 शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास काय होईल, असे तुम्हाला वाटते ?

उत्तर

 

 

शासनव्यवहारांत नागरिकांचा सहभाग वाढल्यास पुढील गोष्टी होतील, असे मला वाटते -

i) शासनाच्या सार्वजनिक धोरणांत बदल होऊन ते व्यापक होईल.

ii) समाजातील सर्व घटकांत सुसंवाद निर्माण होऊन, सत्तेवर न आलेल्यांशीही वैचारिक देवाणघेवाण होईल.

iii) शासनाच्या कारभारात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचारासारख्या समस्या कमी होतील. 

iv) व्यापक जनहिताच्या योजना आखल्या जाऊन कोणत्याही घटकाला आपल्यावर अन्याय होतो आहे किंवा दुर्लक्ष होत आहे असे वाटणार नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यही निर्माण होईल.

Previous Post Next Post