भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत

भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत

प्रश्न

 भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत ?

उत्तर

 

 

अनेक कारणांमुळे लोकांचे देशांतर्गत स्थलांतर होत असते. बाहेरून आलेल्या स्थलांतरितांमुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन भूमिपुत्रांच्या चळवळी उभ्या राहतात. त्यातील प्रमुख मुद्दे -

i) भूमिपुत्रांच्या रोजगारांवर गंडांतर येते.

ii) जमिनी बळकावल्या जातात.

iii) जागांच्या किमती वाढतात.

iv) भूमिपुत्रांचे व्यवसाय हिरावून घेतले जातात.

v) भूमिपुत्रांच्या भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण होते.

vi) भूमिपुत्रांचा आर्थिक मक्तेदारीबरोबरच राजकीय प्रभावही कमी होतो. 

Previous Post Next Post