लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे दयोतक असते.
उत्तर
कारण i) लोकसंख्येतील साक्षरतेच्या या प्रमाणाचा थेट संबंध लोकांचे राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध, शैक्षणिक सुविधा व शासनाच्या धोरणांशी असतो. साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण व परिणाम दोन्हीही आहे.
ii) देशानुसार साक्षरतेची व्याख्या बदलते. भारतामध्ये संत वर्षावरील व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतली जाते. ज्या व्यक्तीस लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात टि साक्षर मानली जाते. म्हणून लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे दयोतक असते.