i) देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. ii) देवराई हे समाजाने सांभाळलेले 'अभयारण्य' असते. iii) देवाच्या नावाने राखलेले असल्याने या वनाचे आपोआपच संरक्षण होते. iv) भारताच्या पश्चिम घाटात तसेच संपूर्ण भारतात देवराया आहेत. हे दाट जंगलांचे पुंजके आहेत. v) भारतात 13000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. |