राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील मवाळ व जहाल यांच्या योगदानाची माहिती लिहा

राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील मवाळ व जहाल यांच्या योगदानाची माहिती लिहा

राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील मवाळ व जहाल यांच्या योगदानाची माहिती लिहा. 

उत्तर 

१) मवाळांचे योगदान : १८८५ साली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. इ. स. १९०५ पर्यंत राष्ट्रीय सभेवर मवाळांचा प्रभाव होता. राष्ट्रीय सभेच्या संस्थापकांच्या ब्रिटिशांच्या उदारमतवादी भूमिकेवर व न्यायाच्या तत्वावर विश्वास होता. सुमारे दोन दशके भारतीयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन दरवर्षीच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभा करीत राहिली. 

२) जाहलांचे योगदान : राष्ट्रीय सभेच्या मागण्या पूर्ण न झाल्याने राष्ट्रीय सभेतील तरूणांत असंतोष निर्माण झाला. शासनाच्या धोरणावर ते टीका करू लागले. तसेच लोकजागृती करून सरकारवर लोकमताचे दडपण आणण्याची गरज प्रतिपादू लागले. वंगभंग चळवळीत जहालांनी स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम हाती घेतला. जहाल तरुणांनी वृत्तपत्रे सुरू करून सरकारच्या जुलमी धोरणांवर टीका केली. शांतता मोर्चे काढून सरकारचा निषेध केला. लोकमान्य टिळकांसारख्या  जहालवादी नेत्यांना सरकारने कडक शिक्षा दिल्या. 

Previous Post Next Post