संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा
अविश्वास ठराव
उत्तर :
मंत्रिमंडळाला संसदेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार काम करू शकते. सदस्यांनी हे बहुमत काढून घेतल्यास सरकार सत्तेवर राहू शकत नाही, आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही; असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. तो बहुमताने सिद्ध झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.