भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा

भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा

भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा.

उत्तर :

भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 

i) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायदयाचा आदर करणे. 

ii) शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे.

iii) भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. 

iv) दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. 

v) भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे.

Previous Post Next Post