शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले ?

उत्तर :

सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. या शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले. 

i) जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. 

ii) राष्ट्राराष्ट्रामधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार - कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. 

iii) सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधाना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना 'मदत' करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखादया देशाला 'शत्रुराष्ट्र' म्हणून सबोधण्याऐवजी ‘स्पर्धक राष्ट्र’ ही संकल्पना पुढे आली. 

iv) संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. 

v) पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

Previous Post Next Post