स्पष्ट करा.
सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे.
उत्तर :
दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. निवडणुकांनंतर सरकार बदलू शकते; पण सरकार बदलले तरी नोकरशाही मात्र कायमस्वरूपी असते. नोकरशाहीला प्रत्येक सरकारच्या काळात काम करावे लागते. प्रत्येक सरकारची ध्येयधोरणे राबवावी लागतात. ही सर्व कामे कोणत्याही एका राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या लोकांकडून होत नाहीत; म्हणून सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे.