ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली ?
उत्तर :
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत होता. त्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. ब्रिटिशांनी जरी युद्ध जिंकले असले तरी त्यांची या युद्धात बरीच शक्ती खर्च झाली होती. भारतासारख्या खंडप्राय देशावर राज्य करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज होती. त्यातच भारतीयांचा स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक झाला होता. यांचा गांभीर्याने विचार करून ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले उचलली.