आकाशवाणीचा इतिहास लिहा

आकाशवाणीचा इतिहास लिहा

आकाशवाणीचा इतिहास लिहा.

उत्तर :

i) स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. 

ii) नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस' (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ' (एआयआर) असे झाले.

iii) भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. 

iv) ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी' हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. 

v) त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. 

vi) ‘विविधभारती' या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.

Previous Post Next Post