संकल्पना स्पष्ट करा जलक्रांती
उत्तर :
i) भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली आहे.
ii) राजस्थानमध्ये हजारो "जोहड' (नदयांवरील मातीचे बंधारे) निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंह प्रसिद्धीस आले होते. सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नदया पुनरुज्जीवित केल्या.
iii) त्यांनी तरुण भारत संघ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये सुमारे अकरा हजार जोहड निर्माण केले.