संकल्पना स्पष्ट करा वीस कलमी कार्यक्रम

संकल्पना स्पष्ट करा वीस कलमी कार्यक्रम

 

संकल्पना स्पष्ट करा

प्रश्न

 

वीस कलमी कार्यक्रम

उत्तर

 

 १ जुलै १९७५ रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

i) शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे. 

ii) कामगारांचा उदयोगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. 

iii) करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 

iv) जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 

v) हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.

 


Previous Post Next Post