टिपा लिहा पर्यटनाची परंपरा

टिपा लिहा पर्यटनाची परंपरा

प्रश्न 

टिपा लिहा पर्यटनाची परंपरा


 उत्तर 

 

i) अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला.

ii) भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा-यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणे हे त्यांचे धार्मिक पर्यटन होते. 

iii) व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विदयाभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत.

iv) मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.
Previous Post Next Post