प्रश्न |
गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. |
उत्तर
|
i) गांडूळ शेतातील माती वरखाली करीत असतात. त्यांना खादय म्हणून मातीत कुजणारे घटक लागतात. ii) त्यामुळे सेंद्रिय पदार्थांच्या विघटनात देखील त्यांचा मोठा वाटा असतो. iii) जमीन भुसभुशीत झाली की रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते. iv) गांडुळांच्या विष्ठेने जमिनीला खत मिळून ती सुपीक बनते. या सर्व कारणांमुळे गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र असे म्हणतात. |