स्पष्ट करा स्वच्छ भारत अभियान

स्पष्ट करा स्वच्छ भारत अभियान

 

 स्पष्ट करा

प्रश्न

स्वच्छ भारत अभियान

उत्तर

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५० व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी 'स्वच्छ भारत अभियानाची' संकल्पना मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर २०१४ या दिवशी हातात झाडू घेऊन साफसफाई करत 'स्वच्छ भारत अभियानाचे' उद्घाटन केले. मोंदीनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. तर 'एक कदम, स्वच्छता की ओर' या घोष वाक्यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील असा आशय व्यक्त करण्यात आला. नरेंद्र मोदींनी इंडिया गेटमधून या राष्ट्रीय अभियानास प्रारंभ केला. पण, गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहने मोदी यांनी केले आहे.

स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण भारतातील अस्वच्छता दूर करणे हा असून याद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात करून जनतेच्या मनोवृत्तीत बदल घडून आणण्याचा प्रयत्न या अभियानात केला जात आहे. 


Previous Post Next Post