भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे
उत्तर :
i) भारत देश विकसनशील आहे. परंतु नवनवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केल्याने अनेक नवीन उद्योगधंदे भारतात विकसित झाले आहे.
ii) ज्या ज्या भागात उद्योगधंदे स्थापन झाले तिथे रोजगाराच्या निमित्ताने लोकांचे स्थलांतर झाले. तो भाग दाट लोकवस्त्याचा झाला.
iii) नगराचे रूपांतर महानगरात झाले. लोकांच्या सुखसुविधा वाढल्या, त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले. त्याचा प्रभाव ग्रामीण भागावर पडल्याने ग्रामीण लोकचेही राहणीमान सुधारले, त्याच्याही सुख - सुविधेच्या मागणीत वाढ झाली. तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, कॉलेजेस, नवनवीन फ्लॅट सिस्टीम सुरू झाल्याने ते शहरांशी जोडल्या जाऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागाचे शहरात रूपांतर होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच नागरीकरणाला सुरुवात झाली. अशाप्रकारे भारतात नागरीकरण वाढत आहे.