पृथ्वी सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमानकेंद्र तिच्या केंद्रबिंदूशी असल्याने ते गुरुत्व बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. त्यामुळे आरंभी विराम अवस्थेत असलेली वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच एखादी वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकल्यास पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे तिचा वेग कमी होत जातो. काही वेळाने तो वेग शून्य होतो व त्यानंतर वस्तू सरळ खाली पडते.