टिपा लिहा भारतातील हवाई वाहतूक

टिपा लिहा भारतातील हवाई वाहतूक

टिपा लिहा भारतातील हवाई वाहतूक 

उत्तर

i) भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाईमार्गाचा वापरही वाढत आहे. 

ii) भारत हे एक विशाल राष्ट्र असल्यामुळे, राष्ट्रांतर्गत विविध स्थळांना जोडणाऱ्या वायुमार्गांची सेवा मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. 

iii) भारताच्या औद्योगिक व सांस्कृतिक प्रगतीमुळे जागतिक स्तरावर विशेष संबंध प्रस्थापित केले आहेत. जागतिकीकरणामुळे जगातील निरनिराळ्या राष्ट्रांशी संपर्क साधता यावा म्हणून वायुमार्गांची सेवा विकसित केली आहे.

iv) भारतीय वायुमार्गांचे व्यवस्थापन व नियमन शासकीय स्वायत्त संस्था करतात. देशांतर्गत वायुमार्गांचे व्यवस्थापन 'इंडियन एअरलाईन्स' ही संस्था करते. या संस्थेस 'इंडियन' असेही संबोधतात. इंडियन एअरलाईन्सची सेवा देशांतर्गत उतारू, माल व टपाल वाहून नेण्यासाठी फार उपयोगी आहे. तसेच इंडियन एअरलाईन्सद्वारे या प्रकारची सेवा भारताच्या शेजारी राष्ट्रांना देखील पुरवली जाते.

v) 'एअर इंडिया' ही संस्था आंतरराष्ट्रीय वासी व. माल वाहतूक करते. 

vi) नव्या राष्ट्रीय धोरणांमुळे वायुमार्ग सेवेचा सुमारे १०० देशांशी करार झालेला आहे. त्यामुळे प्रामुख्याने यु.के., चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, आखाती देश, यु.एस.ए. यांच्याशी वायुमार्गानी संपर्क वाढला आहे. 

vii) केंद्र शासनाच्या नव्या बदललेल्या धोरणानुसार खाजगी संस्थांकडूनसुद्धा वायुमार्ग सेवा पुरवली जाते. 

viii) 'पवनहंस' या शासकीय संस्थेमार्फत भारतात हेलीकॉप्टर सेवा उपलब्ध केली गेली आहे. 

ix) भारतातील नगरांमध्ये, महानगरांमध्ये तसेच राजधान्यांच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.


Previous Post Next Post